गांडूळांच्या मदतीने सेंद्रिय पदार्थ कुजवून भू - समृद्धी® गांडूळ खताची निर्मीती होते. गांडूळखतामध्ये पाण्यामध्ये सहजपणे विद्राव्य अशी मुख्य तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये असतात. भू - समृद्धी®गांडूळ खत हे एक अन्नद्रव्यांनी समृध्द असे सेंद्रिय खत व भूसूधारक असून सेंद्रिय शेती मध्ये याचा वापर अन्नद्रव्यांचा उत्तम स्रोत म्हणून केला जातो.
भू - समृद्धी® गांडूळ खतामधील घटक
घटक |
प्रमाण |
सेंद्रिय कर्ब |
१५ - २५ % |
नत्र |
१.० – १.५ % |
स्फुरद |
०.८ – १.० % |
पालाश |
०.८ – १.० % |
फायदे
- भू - समृद्धी®गांडूळ खतामध्ये पिकांना आवश्यक असणारी सर्व अन्नद्रव्ये असतात.
- पिकांच्या एकंदर वाढीमध्ये परिणामकारक रित्या वाढ होते. नवीन पाने, फुले तसेच फांदयाची वाढ होऊन उत्पादनाचा दर्जा आणि साठवण क्षमता वाढते.
- भू - समृद्धी® गांडूळखत वापरण्यास अत्यंत सोपे असून हाताळणी व साठवणूकीस सुरक्षीत आहे. याला कुठल्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही
- भू - समृद्धी® गांडूळ खतामुळे जमीनीची जडणघडण, भुसभुसशीतपणा, जलधारणाशक्ती वाढून मातीची धूप कमी होते.
- भू - समृद्धी® गांडूळ खतामध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करुन देणारे तसेच सेंद्रिय पदार्थ वेगाने कुजवीणारे सूक्ष्मजीव भरपूर प्रमाणात आढळतात
- भू - समृद्धी® गांडूळ खतांमुळे जमीनीमध्ये गांडूळांची संख्या तसेच कार्यक्षमता वाढीस लागते.
- मातीमधून होणारा अन्नद्रव्यांचा –हास रोखला जाऊन वापरलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते
- भू - समृद्धी® गांडूळ खतामध्ये कुठल्याही प्रकारचे हानीकारक सुक्ष्मजीव, विषारी पदार्थ तसेच तणांचे बी इ. नसतात.
- भू - समृद्धी® गांडूळ खताच्या वापराने कीड व रोगांचा प्रादूर्भाव कमी होतो.
- जमीनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवीण्याची प्रक्रीया वेगाने होते.
- अन्नद्रव्यांव्यतीरीक्त पिकांना आवश्यक असणारी संजीवके, संप्रेरके भू - समृद्धी® गांडूळ
खतामध्ये असतात.
वापरण्याचे प्रमाण:
एकरी ५०० ते १००० किलो शक्यतो लागवडीच्या वेळी जमीनीतून द्यावे.
या शिवाय रासायनिक खत देताना १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.
उपलब्धता:
५० किलो बॅग